Posts

Showing posts from February, 2026

Shivjayanti Speech 2026

 शिवाजी महाराज - 'ध्येय, धैर्य आणि धाडस' - एक आदर्श  निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारु  अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी!      नमस्कार, मी किमया चिटणीस , आज आपल्या समोर शिवजयंतीच्या पवित्र निमित्ताने बोलायला उभी आहे.       वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरासमोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतानाच शिवरायांनी आपले ध्येय निश्चित केले होते. शिवराय एक धैर्यशील, धाडसी व प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांनी दाखवून दिले कि कमी सैन्य असले तरी बुद्धीच्या जोरावर मोठ-मोठ्या साम्राज्यांना देखील हरवता येते.      सर्व प्रथम बोलूया गनिमी काव्या विषयी. गनिमी कावा म्हणजे छोट्या-छोट्या टोळ्यांनी झटपट हल्ला करणे, शत्रुला गोंधळात टाकणे आणि नंतर डोंगर-जंगलात लुप्त होणे. हे युद्ध फक्त ताकदीचे नव्हे तर युक्तीचे आणि धाडसाचे होते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी आणि मावळ्यांच्या धैर्याने हे साध्य झाले.      याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे - प्रतापगडाची लढाई! विजापूर दरबारचा अफझल खान मोठ्या फौजेनिशी महाराजांना संपवायला आला होता. पण महाराजा...

marathi article - the serpent's revenge book review

पुस्तक अभिप्राय - द सर्पांट्स रिवेंज (सर्पाचा सूड)   मला वाचनाची खूप आवड आहे आणि विशेषतः पौराणिक कथा मला खूप आवडतात. माझ्या आजीने मला सुधा मूर्ती यांचे 'द सर्पन्ट्स रिव्हेंज – अनयुझ्युअल टेल्स फ्रॉम द महाभारत' नावाचे पुस्तक भेट दिले.  या शीर्षकाचा अनुवाद आहे 'सर्पाचा सूड - महाभारतातील न ऐकलेल्या कथा'. सुरुवातीला, मला ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती. पण जसजसे मी त्यातील कथा वाचत गेले, तसतसे ते पुस्तक अधिकच मनोरंजक वाटू लागले आणि नकळतपणे माझे लक्ष त्यात गुंतले. हे पुस्तक महाभारतासारख्या सुप्रसिद्ध प्राचीन महाकाव्यावर आधारित आहे, परंतु त्यात सांगितलेल्या कथा फारश्या  प्रसिद्ध नाहीत. प्रत्येक कथा मनोजरंजक तर आहेच पण कधीकधी आश्चर्याचे धक्के देखील देते. कथेच्या शेवटी, लेखिका त्या कथेबद्दल काहीतरी खास लिहितात. त्या कथेत घडलेल्या घटनेशी संबंधित ठिकाण, सध्याचे उत्सव किंवा समाजावरील परिणाम यांसारखी माहिती त्या देतात. हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे आणि असे मी आजपर्यंत इतर कोणत्याही पुस्तकात पाहिलेले नाही. माझी आवडती कथा भीमाचा नातू बर्बरीक याची आहे. ही कथा त्याच्या तीन शक...

Hindi debate - Social media ban for children up to 16 years

आदरणीय शिक्षक और विद्यार्थी मित्रों , आज, मै "सोलह साल तक के किशोरों के लिए सामाजिक माध्यमों के प्रयोग पर पूरी तरह से निर्बंध लगाने" के विचार के विरोध में मजबूती से खड़ी हूँ |  इस विषय में पूरी तरह से पाबन्दी लगाना ना तो व्यावहारिक है और ना ही लंबे समय के दौरान फायदेमंद।  सामाजिक माध्यम आज की दुनिया में संवाद का सबसे महत्वपूर्ण साधन है। इस माध्यम से किशोर आपस में बातचीत करते है और जुड़े रहते है। नई चीजों के बारे में सीखते भी है। इस पर पूरी तरह से निर्बंध लगाने से किशोर अलग-थलग पड़ जायेंगे। उनकी सामाजिक जिंदगी में रूकावट आ सकती है।  सामाजिक माध्यम जानकारी हासिल करने का और नई कला सीखने का एक ताकतवर साधन है। किशोर वयीन बच्चे इसका इस्तेमाल छायाचित्रण, संगीत, बागवानी एवं नृत्य ऐसी पाठ्येतर गतिविधियाँ जानने के लिए करते है। उनके शौक और जिज्ञासा को समझने का यहाँ अवसर मिलता है। इस पर रोक लगाना मतलब कुछ ऐसा है, जैसे उनसे कहना की आप पुस्तकालय नहीं जा सकते क्यों की कुछ किताबें नुकसानदायक हो सकती है।  सम्पूर्ण निर्बंध लगाना व्यावहारिक उपाय नहीं हो सकता।  कई बार पाबंदियाँ असल मे...